#UPSC/MPSC #LOKNITI_IAS
परीक्षेला 2/3 महीने राहीले असताना युट्युब व्हिडीओस, टेलिग्राम चॅनल अपडेट्स, वाट्स्सप ग्रुप डिस्कशन इत्यादीचा आणि पर्यायाने मोबाईल चा वापर कमीत कमी करणे अपेक्षित आहे
सततचे नोटीफिकेशन्स मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि बैचेन करीत राहतात, मोबाइलच्या वापरतात परीक्षार्थी इतके आकंठ बुडुन जातात की त्यांना बहुमोल वाया गेलेला वेळ लक्षातही येत नाही.
दर एक तासांनी समजा 15 मिनिटे मोबाईल वापरला तर दिवसांत साधारणपणे 180 मिनिटे आणि 5400 मिनिटे एक महीन्यात वाया जातात, दररोज आपल्याला नवीन 24 तास जिंकण्यासाठी मिळतात, स्वतःवर काम करण्यासाठी मिळतात, ते मोबाईल वर खर्च करु नका.
समाज माध्यामांचा सततचा वापर आपल्यासाठी माहितीचा पुर घेऊन येत असला तरी या पुरात आपण इतंक दुर वाहून जातो की आपल्या नावीन्यपूर्ण आणि सृजनशील विचारसरणीवर पाणी फिरते. आपली एकाग्रता हळुहळु नष्ट होते, मेंदुची आकलनक्षमता कमी होत जाते, जलद निर्णय क्षमता क्षीण होत जाते, यासर्वच गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो, आपली प्रोडक्टव्हीटी कमी होत जाते पर्यायाने आपण अनिश्चिततेत्या नौकेत दिशा भरकटल्यासारखे चौफेर घुटमळत राहतो. हे सगळे सुरु होते मोबाईल च्या सतत वापरण्याच्या सवयीमुळे त्यामुळे मोबाईल वापरण्यावर काही शिस्त लावली पाहिजे, दिवसभरातून फक्त अर्धा तासच मोबाईल वापरायला हवा.
मोबाईलचा कमी वापर आपल्याला परीक्षेत अधिकाधिक जास्त गुण मिळवून द्यायला खुप मदत करेल. त्यामुळे आतापासूनच मोबाईल वापरावर बंधने घाला, आॅनलाईन स्टडी मटेरियल शोधत बसण्यापेक्षा टेक्स्ट मटेरियल वर अधिक फोकस करा. चांगला रिझल्ट येईल.
- टिम लोकनीति
@mpscnavimumbaiअभ्यासात सातत्य ठेवा, नक्की सिलेक्ट व्हाल!!!